|| श्रींचे अवतारकार्य ||
ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रिमुनी यांच्या तपः भावाने व कर्दम ॠषींपासून देवाहुतीच्या ठिकाणी उत्पन्न झालेली कन्या अनसूया हिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने कृतयुगामध्ये त्रिमूर्तिस्वरूप श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. कलियुगामध्ये जुलमी म्लेंच्छ राजांच्या राजवटीत तत्कालीन समाजाची परिस्थिती अत्यंत शोचनीय व दयनीय झाली होती व 'त्राहि भगवन्' असे म्हणण्याची पाळी ज्या वेळी निर्माण झाली त्या वेळी'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे'या देवोक्तीची सत्यता पटवून देण्याकरिताच की काय मद्रास इलाख्यातील पूर्वगोदावरी जिल्हयातील 'पदगया' नामक क्षेत्रात(पीठापूर येथ) 'श्रीपादश्रीवल्लभ' या नावाने श्रीदत्तात्रेयांनी भक्तजनोध्दारार्थ अवतार धारण केला. त्या अवताराची माहिती संक्षेपाने पुढील प्रमाणे आहे
वेदमूर्ती आपलराज या नावाच्या ब्राह्मणाची सुमती नावाची एक साध्वी स्त्री होती. तिने घरी श्राध्द असतानाही आपल्या दारी अतिथिवेषाने आलेल्या श्रीदत्तात्रेयांना भिक्षा घातली. त्यामुळे सन्न होऊन अतिथीने आपले खरे स्वरूप प्रकट केले व'आई हवा तो वर माग 'असे तिला म्हटले. तेव्हा त्या अतिथिवेषधारी श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घालून ती साध्वी म्हणाली की ''आपण ज्या 'आई' या शब्दाने मला यापूर्वी संबाधिले तो शब्द आपण खरा करावा.''श्रीदत्तात्रेयांनी 'तथास्तु' म्हटले. कालांतराने त्यांनी तिच्या उदरी जन्म घेतला. हाच कलियुगातील 'श्रीपादश्रीवल्लभ' या नावाचा श्रीदत्तात्रेयांचा सिद्ध प्रथमावतार होय.
श्रीक्षेत्र कुरवपूर( कुरूगङी), जि. रायचूर(आंध्र राज्य) येथे श्रींनी अवतारकार्य संपविले आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते रायचूरपर्यत सोलापूरमार्गे मद्रास मेलने यावे. रायचूर स्टेशनवर उतरून टांगा अगर अन्य वाहनाने सिटी टॉकीजजवळ उतरावे; तेथुन सकाळी 8.30 वाजता खासगी मोटार 'यापलदिनीला' जाण्यासाठी निघते.( रायचूर ते गढवाल मार्ग) तेथून बैलगाडीने 'आतकूर' या ठिकाणी जावे. तेथून कोळी लोकांच्या साह्याने नदी ओलांडून 'श्रीक्षेत्र कुरवपूरला' जावे. तेथे सेवेकरी व्यवस्था करितात.
यानंतर ज्या ब्राम्हण स्त्रीला शनि दोषव्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्र ाप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर व-हाडात करंज नगरातील( हल्ली लाडाचे कारंजे) वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मास आली. जातकावरून तिचे नाव अबांभवानी ठेवण्यात आले. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणा-या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले. पूर्वसंस्कारामुळे ती त्या वेळीही शनि दोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. त्या पुत्राचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच आपले ''श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी'' होत.